मुंबई, ता. २० : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून घोषित करा, अशी मागणी राज्यातील साहित्यिक, विचारवंत आणि लोककलावंतांकडून दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. दरम्यान, या मागणीचा सरकारबरोबरतच अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने कार्यरत असलेल्या संघटनांनाही विसर पडला असल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राज्यात १ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. यानिमित्ताने ‘लेखन प्रेरणा दिन’ साजरा करण्याची मागणी पुन्हा समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्धी वर्षानिमित्त या मागणीसाठी ज्येष्ठ साहित्यिक अर्जून डांगळे, डॉ. बाबुराव गुरव, मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. भारत पाटणकर, डॉ. यशवंत मनोहर, सुबोध मोरे आदींनी ‘लेखन प्रेरणा दिन’ साजरा करण्यासाठी सरकारला पत्र पाठवले होते. राज्यातील विविध साहित्यिक संघटनांसह विद्यार्थी संघटनांनीही पाठिंबा दिला होता. त्यावर सरकारकडून निर्णय घेण्यात आला नसल्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.