राज्यात जीवघेण्या अपघातांना ब्रेक
गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातात नगण्य वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहनांबरोबर रस्ते अपघातांच्या घटनादेखील वाढल्या होत्या, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जीवघेण्या अपघातांना ब्रेक लागला. तसेच अपघातात नगण्य वाढ आणि मृत्यूमध्येही घट हाेत आहे. देशात रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. रस्ते अपघात कमी करण्यासाठी आरटीओसह वाहतूक पोलिस विविध योजना राबवित आहेत.
रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांतून प्रवासी वाहतूक करणे, वेगाने वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत बसविणे, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे ही कारणे आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून, परिणामी अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.
-------------
राज्यातील आकडेवारी
कालावधी - जानेवारी ते जून २०२४ जानेवारी ते जून २०२५
जीवघेणे अपघात - मृत्यू
७६७४ ८३०२
७६९५ ८२७६
......
गंभीर अपघात - अपघात - जखमी
७५१८ ११३०८
७८४९ १२०६८
.....
किरकोळ अपघात - जखमी
२४५६ ४३९४
२२०७ ४१६७
......
एकूण अपघात
१८८५६
१८८२६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.