सात हजार प्रवाशांना मध्य रेल्वेकडून नाश्ता
मुंबई, ता. २० : मुंबईवर तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मंगळवारी रौद्ररूप धारण केले. रुळांवर पाणी साचल्याने उपनगरी रेल्वेमार्ग ठप्प झाले. गाड्या रद्द झाल्या आणि हजारो प्रवासी स्थानकांवर अडकून पडले. दुपारपासून संध्याकाळपर्यंत कोणी कामावर जाताना, तर कोणी घरी परतताना स्थानकावर तासनतास थांबून होता. या त्रस्त प्रवाशांच्या मदतीला मध्य रेल्वे धावून आली. कर्मचाऱ्यांनी विविध स्थानकांवर जेवण, नाश्ता आणि पाण्याचे वाटप करून थकलेल्या प्रवाशांना दिलासा दिला.
दरम्यान, पावसामुळे रेल्वेसेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल अधिकच वाढले. सोमवारपर्यंत कसाबसा धावणारा रेल्वे प्रवास मंगळवारी पूर्णपणे ठप्प झाला. कामावरून परतताना किंवा घरी पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेले प्रवासी गर्दीने फुललेल्या सीएसएमटी, दादर, ठाणे, कुर्ला, पनवेल या स्थानकात अडकून पडले. पाण्याचा घोट आणि खाण्यासाठीचे कणसुद्धा मिळणे कठीण झाले. ही बिकट परिस्थिती लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तत्काळ पुढाकार घेत प्रवाशांना बिस्कीट, नाश्ता आणि पाण्याचे पॅकेट वाटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.