भिजलेल्या डाळी, धान्याचे करायचे काय?
छोट्या दुकानदारांच्या चेहऱ्यावर चिंता कायम
मुंबई, ता. २१ : मिठी नदीचे कुर्ला परिसरातील अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरले. त्यामुळे पाणी भरलेल्या परिसरातील छोटे व्यापारी, किराणा मालाच्या, कपड्याच्या दुकानदारांच्या चेहऱ्यावर भिजलेल्या मालाचे करायचे काय, नुकसानभरपाई कशी करणार हीच चिंता आहे. भिजलेला माल खराब झाल्याने तो विकायचा कसा, नवा माल आणायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
कुर्ला परिसरात कपाडिया नगर, कुर्ला डेपो, टॅक्सीमन कॉलनी, टाकीया वार्ड, परीघ खाडी, इंदिरा नगर या मिठी नदीला लागून असलेल्या झोपडपट्टीत मोठ्या लहान किराणा दुकाने, कपड्याची दुकाने आहेत. दररोज लागेल तसा माल आणून विकणाऱ्या या छोट्या व्यापाऱ्यांची उलाढाल जुजबी असते. त्यावरच ते आपले घर चालवतात, मात्र दोन दिवस भरलेल्या पाण्यामुळे रहिवासी वरच्या माळ्यावर गेले, इतर ठिकाणी गेले, मात्र दुकानातील माल इतरत्र हलवणे शक्य नव्हते. त्यामुळे डाळी, धान्य पावसाच्या पाण्याने खराब झाला आहे. तो आता टाकून देण्याशिवाय पर्याय नसल्याची खंत प्रवीण चोथे या परीघ खाडी येथील दुकानदाराने व्यक्त केली.
कोणीच वाली नाही
छोटे दुकानदार आपल्या हिमतीवर झोपडपट्टीत व्यवसाय करतात, लोकांच्या गरजा पूर्ण करतात. वितरण व्यवस्थेतील तळामध्ये काम करणारे दुकानदार वाऱ्यावरच असतात. आपत्तीमध्ये त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. २६ जुलै २००५ च्या महापुरातही हा घटक मदतीपासून वंचित होता, आम्हाला कोणी वालीच नाही, अशी खंत दुकानदारांनी व्यक्त केली.
कोट-
झोपडपट्टी परिसरातील शिरलेल्या पाण्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. डाळी, धान्य, कपड्याचा माल पाणी लागल्याने खराब झाला आहे. त्यामुळे सरकारने मिठी नदीलागतच्या छोट्या दुकानदारांना नुकसानभरपाई द्यावी.
- सुभाष गुप्ता, सहसरचिटणीस, कुर्ला व्यापारी असोसिएशन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.