स्वदेशी विचाराने जगाला नवा मार्ग दाखवा
सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : ‘आपल्या पूर्वजांनी धर्मग्रंथ लिहिले; पण कधीही कुणावर धर्मांतराचा दबाव आणला नाही, तर सगळ्यांना एकत्र आणण्याचे कार्य केले. जग भारताकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे. आपण स्वदेशी विचारसरणी स्वीकारून जगाला एक नवीन मार्ग दाखवला पाहिजे, असे आवाहन रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माेहन भागवत यांनी केले.
मुंबईत ‘आर्य युग विषय कोश’ या विश्वकोशाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बाेलत हाेते.
अतिआत्मविश्वासामुळे भारतीय ज्ञानस्रोतांचा आणि स्वदेशी विचारधारेचा विसर पडण्याचा धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले, ‘आपल्या पूर्वजांनी अनेक ग्रंथ रचले. भारतीय संस्कृती, विज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार केला. त्यांनी कधीही कुणावर आक्रमण किंवा जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केला नाही, तर सद्भावना, ज्ञानप्रसार आणि एकतेचा संदेश दिला. भारतात अशी माणसे येतात जी जगभरातील हिंदू समुदायाशी, संस्कृतीशी जोडलेली आहेत आणि ज्यांनी अनेक कठीण परिस्थितीतही आपली ओळख आणि परंपरा जिवंत ठेवली आहे.’
---
धर्मग्रंथ, संस्कृती
ही मूळ ओळख!
‘इतिहासात अनेक परकीय आक्रमकांनी भारताची संपत्ती लुटली. या आक्रमकांनी भारतीय संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला, तरीही आज भारतात आध्यात्मिक ज्ञान जिवंत आहे. आर्यावर्ताचे वंशज म्हणून भारतीय समाज विज्ञान, श्रद्धा आणि सामर्थ्य यांचा सुंदर संगम साकारत आहे. पाश्चात्त्य ज्ञान आत्मसात करणे वाईट, चुकीचे नाही; परंतु आपले स्वतःचे धर्मग्रंथ, संस्कृती आपल्या अस्तित्वाची ओळख आहेत. ही ओळख कायम ठेवून आधुनिकतेशी जुळवून घ्यायला हवे,’ असा संदेश भागवत यांनी नव्या पिढीला दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.