काँग्रेसच्या टीकेला मनसेचे प्रत्युत्तर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. १८ : राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्या भूमिकांवर टीका केल्यानंतर मनसेनेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली, ‘मनसेची भाषा संविधानिक नाही, तसेच राज ठाकरे यांची हिंसा आणि द्वेषाची भाषा काँग्रेसला मान्य नाही, असे सावंत यांनी म्हटले होते, त्याला मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्र हे भाषावार निर्माण झालेले राज्य असून, मराठी माणसाचा प्रश्न हा आमच्या अजेंड्यावर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याबाबत आम्ही नेहमीच भूमिका घेत आलो आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण हिंसाचार किंवा द्वेषपूर्ण नसून, ते केवळ मराठी माणसाच्या हितासाठी असते. काँग्रेसने विचारधारा सोडून वागल्याने बिहारमध्ये त्यांची घसरण झाली. काँग्रेसला मनसेचा एवढा त्रास असेल, तर मग पूर्वी आमच्यासोबत का आलात, केवळ निवडणुकीसाठी का.’ असा सवालही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.