मुंबई

९९व्या संमेलनात हिंदी सक्तीविरोधात येणार ठराव

CD

९९व्या साहित्य संमेलनात हिंदी सक्तीविरोधात येणार ठराव
अभिजात भाषेसंदर्भातील कार्यक्रमांवर भर असण्याची शक्यता

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. २ : छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी, सातारा येथे भरलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती लादली जाऊ नये, यासाठीचा ठराव आणला जाणार आहे. तसेच त्रिभाषा धोरणालाही विरोध दर्शवला जाणार असून सरकारने जनमताचा कौल लक्षात घ्यावा, शेकडोंनी बंद होणाऱ्या मराठी शाळा वाचविण्यासाठीही सरकारने पुढाकार घ्यावा, आदी मागण्या करणारे ठरावही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून आणले जाणार आहेत.

संमेलनाच्या नियामक मंडळाची बैठक शनिवारी (ता. ३) होण्याची शक्यता असून या बैठकीत राज्यभरातून विविध स्थानिक साहित्य संघटनांकडून आलेल्या ठरावांचा अभ्यास केल्यानंतर काही महत्त्वाचे ठराव निश्चित करण्यात आले आहेत. त्यात हिंदीविरोधावर सर्वाधिक भर देण्यात आल्याचे महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात येते.
अनेक वर्षांपासून‍ न्यायप्रक्रियेत प्रलंबित राहिलेल्या सीमावादाचा, सीमावर्ती भागातील शाळांचा विषय तसेच मराठी भाषा विषय दहावीपर्यंत सक्तीचा करण्यात आला असला तरी मूळ मागणी बारावीपर्यंतची होती. त्या पार्श्वभूमीवर संबंधित कायद्यात दुरुस्ती करून राज्यात सर्व मंडळांच्या सर्व शाळांतून मराठी भाषा विषय बारावीपर्यंत सक्तीचा करणारी दुरुस्ती तातडीने करावी. तसेच मराठी भाषा विषय सर्व ज्ञानशाखांमधून पदवीपर्यंत शिकवला जाईल, याची सोय करणारा कायदा करावा, आदी मागण्यांचा ठरावही संमेलनात मांडले जाणार आहेत.
--
या ठरावांवर असेल भर
मराठीला अभिजात दर्जा दिला गेला असला तरी असा दर्जा दिला गेल्यानंतर सर्व लाभ केंद्रांकडून मराठीला करून दिले जाणे आवश्यक आहे. ते मिळवण्यासाठी केंद्रावर दबाव निर्माण करण्याचे तसेच राज्याच्या पातळीवरही प्रत्यक्ष कृतीपर कार्य सरकारने करण्यासाठी एका अशासकीय तज्ज्ञांच्या समितीची स्थापना करावी, तसेच केंद्राने अद्याप अभिजात दर्जाचे कोणतेच लाभ मराठीला देणारा शासन निर्णय निर्गमित केलेला नाही. तो करून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करणे.

मराठी विकास प्राधिकरणाचा हवा कायदा
राज्यातील असंख्य शाळांत शालेय ग्रंथालये कार्यरत नाहीत. मुलांवर वाचन व ग्रंथ संस्कारांची असणारी ही केंद्रे जगतील यासाठी शालेय ग्रंथपालांची नवीन भरती करावी तसेच शालेय ग्रंथपालांची पदे निर्माण करणे, अपारंपरिक ‘आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ’ मराठी भाषा विभागानेच स्थापन करणे, ५६ पृष्ठांचे राज्याच्या तज्ज्ञ भाषा सल्लागार समितीने फेब्रुवारी २०२२ मध्ये सरकारला सादर केलेले संपूर्ण धोरण हे महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण म्हणून तातडीने जाहीर करणे, मराठी विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा कायदा करणे, मराठी भाषा विभागाला कोणतेच स्वतंत्र काम नसल्याने तो बंद करून त्याऐवजी राजभाषा मराठी विभाग स्थापावे, अनुवादासाठी साहित्य अकादमीसारखी स्वायत्त संस्था या स्वरूपात स्थापन करावी, या विषयांच्या ठरावांवर भर असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Satish Bahirat : एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

SCROLL FOR NEXT