‘बिनविरोध’चे भाजपकडून समर्थन
मतदारांचा विश्वास असल्याचा दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : महापालिका निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे सर्वात जास्त नगरसेवक बिनविरोध निवडून येणे, म्हणजे सामान्य मतदारांचा आमच्यावर विश्वास असल्याचे प्रत्युत्तर भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिले आहे.
भाजपचे सर्वाधिक मतदार बिनविरोध निवडून आल्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्याला कुलकर्णी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सामान्य मतदारांचा पक्षावर आणि नेतृत्वावर विश्वास असला की राजकारणात चांगली माणसं बिनविरोध निवडून येतात. महापालिका कोणाच्या बापाची नसते, तर ते एक लोकशाहीचे मंदिर आहे, हे संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. तुमच्या उमेदवारांनी उमेदवारी मागे का घेतली, ते सांगा. प्रलोभने देण्याची आमची परंपरा नाही, त्याची गरजही आम्हाला नाही. संजय राऊत विकले गेले आहेत. त्यांच्या एबी फॉर्मसोबत किती पैसे दिले हेही आम्हाला ठाऊक आहे, अशी टीका कुलकर्णी यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.