आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या बैठका
मुंबई, ता. २० : पालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने पुढील राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वरळी मतदारसंघात भाजपने पहिली ‘चिंतन बैठक’ घेऊन ठाकरे गटाला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
वरळीतील प्रभाग क्रमांक १९६ मध्ये सोमवारी ही बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीनंतरची राजकीय परिस्थिती, पुढील काळात पक्षाने कशा पद्धतीने काम करावे, तसेच नागरिकांच्या प्रश्नांपर्यंत अधिक प्रभावीपणे कसे पोहोचता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली. पक्षाचे संघटन अधिक मजबूत करून भाजपचा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे, स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी थेट संवाद वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.