नियमित २० डब्यांसह
धावणार ‘वंदे भारत’!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : पश्चिम रेल्वेने वंदे भारत आणि कर्णावती एक्स्प्रेसच्या सेवांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये वाढवलेले २० डबे कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्णावती एक्स्प्रेस आणखी काही महिने वांद्रे टर्मिनसवरूनच धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये यापूर्वी १६ डबे होते; मात्र प्रवाशांची वाढती संख्या आणि गर्दी लक्षात घेऊन चार अतिरिक्त डबे जोडण्यात आले होते. या अतिरिक्त डब्यांत तीन चेअर कार आणि एक एक्झिक्युटिव्ह क्लास डबा समाविष्ट आहे. २८ एप्रिलपासून ही रचना कायम करण्यात आली आहे. दरम्यान, कर्णावती एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनसवरून चालवली जात आहे. ही तात्पुरती व्यवस्था ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच या एक्स्प्रेसमध्ये एक अतिरिक्त एसी चेअर कार डबा जोडण्यात आला आहे. त्यामुळे या गाडीची रचना २१ ऐवजी २२ डब्यांची झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.