मुंबई

आयकरकडून कारखान्यांना दिलासा

CD

मुंबई,ता. ७ ः सहकारी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केलेल्या उसाच्या दरावर १० हजार कोटी आयकराची रकमेची आयकर विभागाकडून मागणी करण्यात येत होती. ही रक्कम व्यावसायिक खर्च म्हणून परिगणित करण्यास या वेळी केंद्र सरकारकडून मांडलेल्या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना आयकरबाबत मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे.

या आयकराचा प्रश्न साखर कारखान्यांना १९९०-९१ म्हणून ३० वर्षांपासून भेडसावत होता. आयकर प्राधीकरणाकडून सातत्याने आयकराची मागणी केली जात असे. साखर कारखान्याची खाती गोठवली जाऊ नयेत म्हणून दंडात्मक कारवाईच्या अनुषंगाने एक हजार कोटींचा भरणा कारखान्यांनी आयकर विभागात केला होता. त्याचा परतावा होऊ शकेल असे सांगण्यात येत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार आणि गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे आभार साखर संघाच्या वतीने मानण्यात आले. त्याचप्रमाणे मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा प्रश्न सोडवण्यास मदत केली. त्यामुळे त्यांचेही आभार साखर संघाने मानले आहेत. तसेच, माजी मंत्री शरद पवार यांनी सहकार मंत्रालयासोबत सातत्याने बैठका घेतल्या. त्यांचेही आभार मानण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT