मुंबई

आमदार राणा पाटील यांचे आरोप निराधार

CD

मुंबादेवी, ता. २ (बातमीदार) : राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव (उस्मानाबाद)चे पालकमंत्री तानाजी सावंत चांगले काम करीत असतानाही जिल्ह्यातील निधीवाटपाबाबत दुजाभाव करीत असल्याचा आरोप भाजपचे आमदार राणा पाटील यांनी केला आहे. अशा स्वरूपाचा आरोप विद्यमान सरकारमध्ये असूनही केला जात असल्याने आमदार राणा पाटील हे नेमके कोणत्या आधारावर आणि का बोलत आहेत, असा सवाल धाराशिवचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्तात्रय साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
साळुंखे म्हणाले, की यातील ७० टक्के निधी हा विविध योजनांवर खर्च झाला असून ३० टक्के निधी जिल्हाधिकारी यांच्‍याकडे शिल्लक आहे; मात्र तरीही भाजपचे विद्यमान आमदार राणा पाटील हे निधीवाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप करीत असून यात काहीच तथ्य नाही, असे दत्तात्रय साळुंखे यांनी म्हटले. निधीवाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करून पालकमंत्री सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या गटात परत प्रवेश करावा यासाठी तर हा खटाटोप केला जात नसावा ना, अशी शंकाही या वेळी दत्तात्रय साळुंखे यांनी उपस्थित केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT