मुंबई

पाड्या-पाड्यांमध्ये विज्ञान मेळाव्याचा उत्साह

CD

विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : विक्रमगड येथूनच जवळच असलेल्या टेटवाली पाड्यामध्ये प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन व जिल्हा परिषदे शाळा यांच्या सहकार्याने विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्याप्रमाणे जीवन हे पृथ्वी, पाणी, हवा, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांपासून बनलेले आहे असे मानले जाते, ही तत्त्वे सोप्या पद्धतीने मुलांना समजण्यासाठी प्रथम फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या वतीने हे मेळावे आयोजित करण्यात आले. विज्ञान प्रकल्प मुलांसोबत तयार करण्यात आले. याकरिता मुलांना गावातील स्वयंसेवक, माता पालक, शिक्षकांनी मुलांना सहकार्य केले.
मुलांना विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, शास्त्रज्ञांविषयी अधिकची माहिती व पंचतत्त्व काय आहे हे मुलांसोबतच पालकांना व गावकऱ्यांनासुद्धा समजण्यासाठी या विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या पंचतत्त्वांसोबतच मुलांनी पाठ्यपुस्तकातून आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या मदतीने इतर प्रकल्पसुद्धा बनवले होते. त्याचेसुद्धा मेळाव्यात सादरीकरण करण्यात आले होते. या मेळाव्यात गावातील स्वयंसेवक आणि युवकांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

Numerology : 'या' 3 महिन्यात जन्मलेली व्यक्ती असते सगळ्यांची लाडकी; एका इशाऱ्यावर लोक त्यांच्यासाठी काहीही करतात

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

SCROLL FOR NEXT