मुंबई

‘महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज’चा संपाला पाठिंबा

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने ‘महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन’ने पाठिंबा जाहीर केला आहे. प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही कर्मचाऱ्यांच्या लढ्यात सहभागी होऊ, असे संघटनेने म्हटले आहे.

भारतीय राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे भारत हे कल्याणकारी राष्ट्र आहे आणि पेन्शनच्या स्वरूपात सामाजिक सुरक्षितता उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. ज्यातून या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही आयुष्यात एक स्थैर्य आणि सुरक्षितता उपलब्ध होईल, हे लक्षात घेता सरकारने हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता जबाबदारीच्या भूमिकेतून ही मागणी त्वरित मान्य करावी, असे आवाहन संघटनेतर्फे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना करण्यात आले आहे.

पेन्शनसाठी निधी उभा करा
पेन्शनला आवश्यक निधी उभा करण्यासाठी सरकारकडे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. पेन्शनच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पैसा हा शेवटी बाजारातच खेळणार आहे, ज्यातून सरकारचे करसंकलन वाढेल. म्हणजेच उत्पन्नात लक्षणीय भर पडेल. यामुळे कर्मचान्यांमध्ये जे स्थैर्य, सुरक्षितता येईल त्यातून प्रोत्साहित होऊन कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल याचीही सरकारने नोंद घ्यायला हवी, असे संघटनेचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT