मुंबई

आमदार राजू पाटील यांनी मांडले पाणीसमस्येचे वास्तव

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : कल्याण-डोंबिवली शहरात पाणीटंचाईची समस्या भीषण आहे. पाण्यासाठी दररोज नागरिक मोर्चे काढत आहेत. नवी मुंबईतील मोरबे धरणातील १४० दशलक्ष लिटर पाणी कोटा मंजूर झाला होता; मात्र अद्याप तो वर्ग करण्यात आला नाही. २७ गावांसाठी अमृत योजनेअंतर्गत काम सुरू आहेत. १०५ एमएलडी पाणी कोटा येथे देण्यात येणार होता; मात्र प्रत्यक्षात ६५ एमएलडी पाणी देण्यात येत आहे. वाढत्या शहरीकरणासाठी हा पाणी कोटा पुरेसा नाही, असे म्हणत कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनात केडीएमसीमधील पाणीटंचाईचे वास्तव मांडले. तसेच मंजूर पाणी कोटा देता येत नसेल, तर येथे नव्याने होत असलेल्या बांधकामांच्या परवानग्या थांबवणार का, असा सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. यावर पूर्ण कोटा कसा देता येईल, याविषयी सूचना एमआयडीसीला केल्या असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

SCROLL FOR NEXT