मुंबई

वारस लावण्याच्या प्रक्रियेने खोळंबले वाहनांचे हस्तांतर

CD

वारसापोटी खोळंबले वाहनांचे हस्तांतर
नागरिकांचा ताण वाढला

नवीन पनवेल, ता.२७ (वार्ताहर)ः वाहन नावावर असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या वाहनावर वारसदाराचे नाव लावण्याची प्रक्रिया अत्यंत क्लीष्ट झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा ताण वाढला आहे. आधी केवळ प्रतिज्ञापत्रावर वारसाचे नाव लावण्याचे काम व्हायचे, मात्र आता नोटरी व न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागते. त्‍यामुळे हजारो वाहनांचे हस्तांतर खोळंबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कुटुंबात ज्या व्यक्तीच्या नावावर वाहन असते, त्याचा मृत्यू झाल्यानंतर वारसाहक्काने त्याची पत्नी अथवा मुलांच्या नावावर वाहन वर्ग पुस्तिकेवर (आरसी बुक) वारसदाराचे नाव लावून घेणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. वाहनांची विक्री झाल्यावर ते वाहन दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करून देण्यासाठी वाहनमालकाच्या वारसाचे नाव लागणे आवश्यक असते. त्यासाठी पूर्वी शंभर रुपयांच्या मुद्रांक दस्तावर (स्टॅम्प पेपर) प्रतिज्ञापत्र सादर करून वाहनास वारसाचे नाव लागत होते. मात्र आता ही प्रक्रिया क्‍लिष्‍ट झाल्‍याने नागरिकांना खेटा माराव्या लागतात.


प्रक्रिया बदलली, ताण वाढला
कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला. काही कुटुंबात पती-पत्नी असे दोघेही गेले. त्यांची मुले-मुली स्थानिक शहर-गावांमध्ये राहत नाहीत, नोकरी, व्यवसायानिमित्त ते अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेले असतात. अशा वारसांना वाहने त्यांच्या नावावर करून घेण्यासाठी अनेक चकरा माराव्या लागतात. एकापेक्षा अधिक वारस असल्यास प्रत्येक वेळी सर्वांनाच हजर राहणे शक्य होत नाही. त्यामुळे वाहनांचे हस्तांतर करण्याची समस्या असेल, तर त्यावर पहिला हक्क वारस म्हणून पत्नीचा असतो. मात्र प्रतिज्ञानपत्र, नोटरी अशी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिचे नाव नोंदणी पुस्तिकेवर लागते. पत्नी नसेल आणि मुले किंवा मुली वारस म्हणून असतील तर त्या सर्व वारसांना एकत्रित प्रतिज्ञापत्र, नोटरी, तसेच न्यायालयातही हजर राहून तेच वारस असल्याचे सिद्ध करावे लागते. ही प्रक्रिया वेळखाउ असल्‍याने अनेक वाहने वापराविना पडून आहेत.


कोरोनानंतर समस्या तीव्र
कोरोना काळात अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्‍तीचे निधन झाले आहे. काही कुटुंबात पती-पत्नी असे दोघेही गेले. त्यांची मुले-मुली स्थानिक शहर-गावांमध्ये राहत नाहीत. नोकरी, व्यवसायानिमित्त ते अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत, अशा वारसांना वाहने त्यांच्या नावावर करून घेण्यासाठी इथल्या अनेक चकरा माराव्या लागतात. एकापेक्षा अधिक वारस असल्यास प्रत्येक वेळी सर्वांनाच हजर राहणे शक्य होत नाही. त्यामुळे वाहनांचे हस्तांतर अडचणीचे ठरत आहे.

विक्रीतही अडचणी
वाहनांबाबत वारस लावण्याची गरज तातडीने तशी भासत नाही. मात्र, जेव्हा दुचाकी अथा चारचाकी वाहनाची विक्री करायची असते, तेव्हा मात्र आधी वारस लावण्याची प्रक्रिया करावी लागते. त्यानंतरच वाहनांची विक्री करणे शक्य होते. चारचाकी वाहनांबाबत ही प्रक्रिया अनिवार्य आहे. कारण त्याशिवाय गाडीचा विमाही काढता येत नाही. तसेच ती चालवताही येत नाही. गाडीची किंमत लाखांच्या घरात असल्‍यास त्यासाठी काही वेळ,पैसा खर्च करणे शक्य असते, मात्र दुचाकीमात्र अनेकदा तशाच पडून राहिल्‍याने भंगारात निघतात.

सेकंडहॅन्ड दुचाकींचे व्यवहारात अडचणीचे
क्‍लिष्ट प्रक्रियेमुळे अनेक दुचाकीचे व्यवहार खोळंबले आहेत. पनवेलसारख्या शहरात हजारो सेकंडहॅन्ड दुचाकींची विक्री दरवर्षी होते. मात्र आपसात विक्री झाली असेल आणि वारस लावण्याची भानगड असेल, तर त्या भानगडीत कुणी पडत नाही. विमा न काढता किंवा नूतनीकरण न करताच दुचाकी मोठ्या संख्येने विकल्या जातात. हे व्यवहार वरच्या वर होतात. मुळात, सेकंडहॅन्ड दुचाकींचे व्यवहार तोकड्या रकमेत होतात. अशावेळी वारस लावण्याच्या प्रक्रियेवर दोन-चार हजार रुपये खर्च करायला कुणी तयार होत नाही. जेव्हा एखादा गुन्हा घडतो, तेव्हा मात्र असे व्यवहार कायदेशीर करण्याची निकड येते.

वाहनधारकाच्या मृत्यूनंतर कौटुंबिक वाद समोर येतात, गाडीची नोंदणी करताना वारस लावून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु यापूर्वी ज्या वाहनधारकांनी वारस नोंदी केल्या नाहीत, त्यांची वारस नोंद लावण्यासाठी त्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये पब्लिक नोटीस देवून, कोर्टाकडून वारस प्रमाणपत्र आणणे बंधनकारक आहे.
गजानन ठोंबरे
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल

वाहनांवर वारस लावण्याची प्रक्रिया अलीकडे क्लीष्ट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना त्याचा त्रास होत आहे. याउलट आता वाहनाच्या नोंदणीवेळी नॉमिनी म्हणून वाहन मालकाच्या वारसाचे नाव लावून घेतले, तर पुढच्या दृष्टीने ते सोयीचे होईल.
गणेश शिंदे, वाहन विक्रेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT