मुंबई

उद्‌घाटन झालेल्या शिल्पाजवळ कचरा

CD

धारावी, ता. १० (बातमीदार) : धारावीतील संत रोहिदास मार्ग व ९० फुटी रस्त्याच्या दरम्यान असलेल्या चौकाचे नुकतेच सौंदर्यीकरण करण्यात आले असून येथे शिल्‍पही उभारले आहे. या शिल्‍पाचे उद्‌घाटन रखडले होते. यासंदर्भात ‘सकाळ’ मध्ये २७ मार्चला ‘चौकाला उद्‌घटनाची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्‍यावर रविवारी (ता. ९) आमदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या शिल्‍पाचे उद्‌घाटन झाले; मात्र नागरिकांना लगेचच येथे कचरा टाकून पालिकेच्‍या सौंदर्यीकरणाला तिलांजली दिल्‍याचे दिसून आले आहे.
काही वर्षांपूर्वी येथील चौकाचे पद्मश्री डॉ. सिवांथी आदीथनार चौक असे नामकरण करण्यात आले होते. गल्या दोन वर्षांपासून येथे भूमिगत काम सुरू असल्‍यामुळे चौकाची नासधूस झाली होती. त्‍यानंतर या चौकाची पुनर्बांधणी व सौंदर्यीकरण करण्यात आले आहे; मात्र येथील नागरिकांनी या चौकाच्‍या उद्‌घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी कचरा टाकल्‍याने संताप व्‍यक्‍त होत आहे. याचा निषेध ज्‍येष्ठ समाजसेवक अनिल कासारे व स्थानिकांनी नोंदवला आहे. जर शिल्प आदर म्हणून उभारले आहे, तर त्याची देखभाल करून घेणे ही जबाबदारी लोकप्रतिनिधी यांची नाही का, असा सवाल कासारे यांनी केला आहे; तर शिल्पाजवळ आमदारांनी आपले नाव लावल्याचा निषेध भाजपकडून करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT