मुंबई

नगरभूमापन सर्वेक्षणाचे काम रखडले

CD

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : भाईंदरजवळील उत्तन परिसरातील पाच गावांचे नगरभूमापन सर्वेक्षणाचे काम पाच वर्षांपासून रखडले आहे. या गावातील रहिवाशांना महसूल विभागाकडून नुकत्याच आलेल्या नोटिसांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे सर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी आहे.

मिरा-भाईंदरमधील १९ महसुली गावांच्या नगरभूमापन सर्वेक्षणाचे काम काही वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. नगरभूमापन सर्वेक्षण झाल्यानंतर रहिवाशांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्क सिद्ध करणारी सनद मिळते. परंतु उत्तन, पाली, चौक, डोंगरी आणि तारोडी या गावांनी सर्वेक्षणाला विरोध केला. त्यामुळे त्यांचे सर्वेक्षण होऊ शकले नव्हते. परिणामी या भागातील रहिवाशांच्या नावे जमिनी नाहीत. जमिनीवर मालकी हक्क सिद्ध होत नसल्यामुळे या गावांमधील रहिवाशांना घर बांधणीची अथवा दुरुस्तीची परवानगी महापालिकेकडून मिळत नाही. त्यामुळे २०१८ मध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना सर्वेक्षणासाठी राजी केले.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खासगी सर्वेअरकडून सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले. या सर्वेअरला कोणत्या दराने काम द्यायचे, यासंदर्भातील एका समितीचे गठण करण्यात आले. या समितीची दोन वेळा बैठक देखील झाली; परंतु या बैठकीत दराबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. परिणामी गेल्या पाच वर्षांपासून सर्वेक्षणाचे काम रखडले आहे. सर्वेक्षण झाले, तर गावठाणांची सीमांकने निश्चित होतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

महसूलकडे कागदपत्रे सादर करण्याचे आव्हान
चौक, डोंगरी, भाटेबंदर, धावगी आदी गावांतील रहिवाशांना महसूल विभागाकडून नुकत्याच नोटिसा प्राप्त झाल्या आहेत. सरकारी, तसेच गायरान जमिनींवरील बांधकामे हटवण्यासंदर्भात उच्च न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर महसूल विभागाने या नोटिसा बजावल्या आहेत. जमिनींसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे या नोटीसांमध्ये नमूद करण्यात आले आहे. परंतु नगरभूमापन सर्वेक्षणाअभावी अनेकांकडे त्यांच्या जमिनींबाबत मालकी हक्काची कागदपत्रेच नाहीत. त्यामुळे महसूल विभागाकडे कागदपत्रे कशी जमा करायची, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

रखडलेले नगरभूमापन सर्वेक्षण सुरू झाले, तर रहिवाशांना मालकी हक्काची कागदपत्रे मिळतील. त्यांना घरबांधणी व घरदुरुस्तीची रीतसर परवानगी मिळेल, त्याचप्रमाणे गावठाणांची हद्द निश्चित झाल्यास रहिवाशांना दिलासा मिळेल. त्यामुळे उत्तनमधील पाच गावांच्या नगरभूमापन सर्वेक्षणाच्या कामाला तातडीने सुरुवात करावी.
- हेलन जॉर्जी गोविंद, माजी स्थानिक नगरसेविका

सर्वेअरना सुधारित दर देणे, भूमी अभिलेख कार्यालयाला जागा देणे आदी कामे प्रगतिपथावर आहेत. उर्वरित जागांचे नगरभूमापन सर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.
- दिलीप ढोले, आयुक्त, मिरा भाईंदर महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT