मुंबई

किसान सभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा

CD

कासा, ता. २९ (बातमीदार) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने उद्या (ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. जमीनविषयक प्रश्न सुटतील, असे ठोस आश्वासन किसान सभेच्या शिष्टमंडळाला संगमनेर येथे २७ एप्रिल २०२३ रोजी महसूल मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांनी दिले आहे.
शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या ताब्यात असलेली जमीन मालकीची झाली पाहिजे, या करिता जमीनविषयक अर्ज सरकार दरबारी सादर केले पाहिजेत. यासाठी किसान सभेच्या वतीने मंगळवारी दुपारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी अध्यक्ष किसन गुजर, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, उमेश देशमुख हे करणार आहेत. तसेच डहाणू आमदार विनोद निकोले हे उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

Sambhaji Maharaj Descendants : शंभूराजांच्या आजोळ घराण्याचे वंशज काय करतात? छत्रपतींशी पिढ्यानपिढ्या जपले आहे रक्ताचे नाते

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

SCROLL FOR NEXT