मुंबई

महामार्गावरील अपघातांवर नियंत्रण

CD

वाशी, ता. १८ (बातमीदार)ः नवी मुंबई शहरातील मुख्य महामार्ग असलेल्या शीव-पनवेल, तसेच ठाणे-बेलापूर महामार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या महामार्गांवर रस्ते अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत असल्यामुळे दरवर्षी ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) निश्चित करून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे शीव-पनवेल, ठाणे- बेलापूर महामार्गांवर यंदा फक्त ५ ब्लॅक स्पॉट असल्याची माहिती तुर्भे विभागाचे वाहतूक निरीक्षक नितीन गीते यांनी दिली आहे.
शीव-पनवेल, तसेच ठाणे-बेलापूर महामार्गांवर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक विभागाने दोन्ही महामार्गावरील शीव-पनवेल महामार्ग, उरण फाटा ब्रिज, नेरूळ एल पी ब्रिज, जुईनगर रेल्वेस्थानक, बस स्थानक, शरयू शो रूम, दत्त मंदिर, तुर्भे ब्रिज, सानपाडा जंक्शन, वाशी गाव सिग्नल दोन्ही बाजू या ठिकाणांना अपघातप्रवण क्षेत्र जाहीर केले आहे. या ठिकाणचे ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नवी मुंबई महापालिका, वाहतूक विभाग, तसेच आरटीओकडून विविध उपाययोजना करून अपघात कमी करण्यावर भर दिला जातो. या ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन, थर्मोप्लास्ट पेंट, कॅटाईज ब्लिंकर्स, रम्बलर उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण कमी आहे.
-----------------------------------------
तीन वर्षांत अपघातप्रवण क्षेत्रातील रस्त्यावर ५ पेक्षा अधिक अपघात, तसेच १० वाहनचालक अपघातांत मृत्यू पावले असतील तर त्याला ब्लॅक स्पॉट जाहीर केले जाते. दोन्ही महामार्गांवर यात घट झाली असून कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी शासनाला पत्र पाठवण्यात आले आहे.
- हेमांगिनी पाटील, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT