मुंबई

रानसईमुळे उरणवासी चिंतामुक्त

CD

उरण, ता. १८ ः तालुक्यात काही दिवसांपासून पावसाने जोर पकडला आहे. तसेच घाटमाथ्यावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. अशातच मंगळवारी (ता.१८) रानसई धरण भरून वाहू लागल्याने उरणकरांची भीषण पाणीटंचाईतून सुटका झाली आहे.
उरण तालुक्यातील २१ गावे, उरण शहर आणि ओएनजीसी, एनएडीसह इतर औद्योगिक विभागासह सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जून महिना जवळपास कोरडाच गेला होता. पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. धरणातील मृत असलेला पाण्याचा साठा ही वापरण्यास सुरवात झाली असल्याने यंदा भीषण पाणीटंचाईचे मोठे संकट उरणकरांवर होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरवातीपासूनच धरणक्षेत्रात पावसाने जोर पकडला असल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत होती. अखेर रानसई धरण भरून वाहू लागल्याने उरणकरांसाठी ही आनंदवार्ता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT