मुंबई

रानसईमुळे उरणवासी चिंतामुक्त

CD

उरण, ता. १८ ः तालुक्यात काही दिवसांपासून पावसाने जोर पकडला आहे. तसेच घाटमाथ्यावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. अशातच मंगळवारी (ता.१८) रानसई धरण भरून वाहू लागल्याने उरणकरांची भीषण पाणीटंचाईतून सुटका झाली आहे.
उरण तालुक्यातील २१ गावे, उरण शहर आणि ओएनजीसी, एनएडीसह इतर औद्योगिक विभागासह सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जून महिना जवळपास कोरडाच गेला होता. पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. धरणातील मृत असलेला पाण्याचा साठा ही वापरण्यास सुरवात झाली असल्याने यंदा भीषण पाणीटंचाईचे मोठे संकट उरणकरांवर होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरवातीपासूनच धरणक्षेत्रात पावसाने जोर पकडला असल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत होती. अखेर रानसई धरण भरून वाहू लागल्याने उरणकरांसाठी ही आनंदवार्ता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकरी कर्जमाफीसाठी बॅंकांची माहिती तयार! ३० जून ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदारांचा समावेश; नियमित कर्जदारांना मिळणार ‘हा’ लाभ

Yogi Adityanath : औरंगजेबाची मोठी घोडचूक काय होती? वीर बाल दिवसानिमित्त योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल!

आजचे राशिभविष्य - 28 डिसेंबर 2025

Panchang 28 December 2025: आजच्या दिवशी मंजिष्ठ, केशर किंवा रक्तचंदन पाण्यात टाकून स्नान करावे

Winter Special Recipe: हिवाळ्याची खास चव! शेंगाचा सिझन संपायच्या आधी सोल्याचे कढिगोळे नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT