मुंबई

मनोज गुळवीसह सात जणांना पोलिस कोठडी

CD

भिवंडी, ता. ३१ (बातमीदार) : शहरातील नारपोली भागात धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यापूर्वी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून वीज खंडित करण्यासाठी गेलेल्या टोरेंट वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या मनसे अध्यक्ष मनोज गुळवी आणि सात जणांना सोमवारी (ता. ३१) भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे मारहाण करणाऱ्या तीन पुरुष व पाच महिलांना न्यायालयाने बुधवार (ता. २) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती ४ च्या कार्यक्षेत्रातील नारपोली-२ देवजीनगर भागातील घर क्र.८८८ या धोकादायक इमारतीवर तोडक कारवाई करण्यापूर्वी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सहायक आयुक्त गिरीधर घोष्टेकर यांनी वीज खंडित करण्यासाठी टोरेंट पॉवर कंपनीला लेखी पत्र दिले होते. त्यानुसार कंपनीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आपले अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार पाठवले होते. कर्मचारी, अधिकारी सरकारी काम करत असताना इमारतीमधील रहिवासी आणि इतरांनी टोरेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मारहाण करून जखमी केले. त्यामुळे पालिकेच्या बिट निरीक्षकाने नारपोली पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष मनोज गुळवी, शीतल पाटील यांच्यासह सहा जणांना रविवारी अटक केली. त्यांना सोमवारी भिवंडी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात हजर केले असता सात आरोपींना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! विद्यार्थी-शिक्षकांची आता ऑनलाईन हजेरी; सर्व शाळांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत, त्यानंतर मुख्याध्यापकांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यात पाच ठिकाणी ईडीचे छापे'; दोन जणांना घेतले ताब्यात, नेमकं काय आहे कारण?

‘टीईटी’चा निकाल १५ जानेवारीपूर्वी! उत्तरसूचीवरील आक्षेपासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदत; प्रत्येक उत्तरपत्रिकेची होणार फेरपडताळणी, पुढच्या वर्षी दोनदा ‘टीईटी’

सोलापूर शहरातून 2 वर्षांत 155 जण तडीपार अन्‌ 50 गुन्हेगारांची येरवडा कारागृहात रवानगी; पोलिस आयुक्तांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

आजचे राशिभविष्य - 24 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT