dead body  sakal
मुंबई

Bhivandi News: पाण्याच्या टाकीत आढळला मुलाचा मृतदेह!

सकाळ वृत्तसेवा

Bhivandi News: भिवंडी शहरातील कुंभारवाडा मोहल्ल्यातील महापालिका कर्मचारी कॉलनीतील २ दिवसांपासून हरवलेल्या ४ वर्षीय मुलाचा मृतदेह राहत्या इमारतीतील पाण्याच्या टाकीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव कुंभार यांनी सांगितले की, मृत विध्यांश गोपाल चव्हाण हा आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता.

शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता खेळण्यासाठी बाहेर गेला होता; परंतु रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. यादरम्यान कुटुंबीयांनी मुलाचा शोध घेऊनही तो सापडला नाही. या प्रकरणी विध्यांशच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्याप्रमाणे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता.

दरम्यान रविवारी दुपारी ३ वाजता त्याचा मृतदेह तो राहत असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला. याप्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला आहे. पाण्याच्या टाकीचे झाकण अर्धे उघडे असल्याने विध्यांश पाण्याच्या टाकीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT