Winter In Mumbai Sakal
मुंबई

Mumbai News: ऐन थंडीत मुंबईतील तापमानात वाढ; थंडी नाहीशी होणार?

सांताक्रूझ येथे आज १९.५ अंश; तर कुलाबा येथे २१.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले. पुढील दोन दिवसात किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत गेल्या आठवड्यात १४ अंशांपर्यंत खाली गेलेल्या किमान तापमानात वाढ होऊन ते १९ अंशांपर्यंत गेले आहे. त्यामुळे ऐन थंडीत मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे.

मुंबईत यंदाच्या मोसमातील १४ अंश निच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. यामुळे मुंबईकर कडाक्याची थंडी अनुभवत होते. भरदिवसाही मुंबईच्या हवेत गारवा जाणवत होता; मात्र गेल्या दोन ते तीन दिवसातच थंडी नाहीशी होऊन किमान तापमानात वाढ झाल्याचे आज दिसले.

सांताक्रूझ येथे आज १९.५ अंश; तर कुलाबा येथे २१.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले. पुढील दोन दिवसात किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या (ता. १) आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१ अंश सेल्सिअस आणि १८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील ४८ तासातही तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army New Uniform: भारतीय लष्कराचा मोठा बदल! ८ वर्षांनंतर नवा ड्रेस कोड लागू; ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम, आर्मीचा 'देसी' लूक चर्चेत

T20 World Cup: पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणार का? भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्टच दिलं उत्तर

Matheran Toy Train: माथेरानची राणी ४ महिने बंद, नवी सेवा सुरू होणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, कधीपासून आणि का?

Manoj Jarange Support : तुकाराम मुंढेंची बदली कराल तर... मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Latest Live Updates Marathi: गृह लक्ष्मी' आणि 'गृह ज्योती' यांसारख्या जनहितार्थ असलेल्या गॅरंटी योजना बंद केल्या जाणार नाहीत- शिवकुमार

SCROLL FOR NEXT