theft crime sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: वाशीत भरदिवसा दोन घरफोड्या; लाखोंचे दागिने गेले चोरीला

A case has been registered in Vashi police station regarding both the incidents| दोन्ही घटनांप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Crime: वाशीमध्ये भरदिवसा दोन बंद घरांमध्ये घरफोडी करून चार लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरण्यात आले आहेत. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.


वाशी सेक्टर-१६ मध्ये राहणारे संजय रामकृष्णन (४७) हे व्यावसायिक उलवेतील भावाच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त गेले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी रामकृष्णन यांच्या घरातील पावणेचार लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. रामकृष्णन यांच्या घराचे दरवाजे उघडे असल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला होता.

त्यामुळे त्यांनी रामकृष्णन यांना संपर्क साधला होता. यावेळी चोरट्यांनी रामकृष्णन यांच्या शेजारील बिल्डिंगमध्ये राहणारे त्यांचे मित्र सचिन निमगरे यांच्या घराचे लॉक उचकटून सोन्याचे दागिने, कॅमेरा असा ३० हजारांचा ऐवज चोरला आहे. त्यामुळे दोन्ही घटनांप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT