murder News  sakal
मुंबई

Mumbai Crime: वृद्धाने केला मुलीचा विनयभंग; रागाच्या भरात बापाकडून खून

नारपोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Bhivandi News: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने संतापलेल्या वडिलांनी ४६ वर्षीय इसमाला बेदम मारहाण करून तेथून पळ काढला. नारपोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

ओमप्रकाश महादेव पाल (वय ४६) असे मृताचे नाव असून तो चार महिन्यांपासून भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात राहून मजुरी करत होता. २२ फेब्रुवारीला रात्री १०.४५ वाजता याच परिसरातील मैत्री पार्क येथील जी-विंग सरस्वती रेसिडेन्सीमध्ये ओमप्रकाश पाल यांच्यासमोर राहणाऱ्या बिलाल समसुद्दीन अन्सारी (वय ३४) याने त्याला लाथाबुक्क्याने मारहाण केली.(mumbai News)

यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. नारपोली पोलिसांनी सांगितले की, बिलाल याच्या अल्पवयीन मुलीचा पाल याने विनयभंग केला होता. त्यामुळे संतप्त होऊन त्याने त्याची हत्या करून पळ काढला. मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी बिलालविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा कसून शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास नारपोली पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद कुमार करीत आहेत.(bhivandi crime news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election: बिहारमध्ये NDA सरकार की...? जनतेचा विश्वास कुणावर? निवडणुकीआधी धक्कादायक ओपिनियन पोल समोर

Irani Cup सामन्यात फुल राडा! विदर्भाचा गोलंदाज अन् दिल्लीकर फलंदाज एकमेकांच्या अंगावर गेले धावून, पाहा Viral Video

Shahu Maharaj: 'हे' दोन मराठा तरुण होते म्हणून औरंगजेब बालछत्रपतींचे धर्मांतर करु शकला नाही, जाणून घ्या त्यागाचा इतिहास

Jaggery Health Benefits: दररोज सुपारीएवढा गूळ देतो ताकद, शुद्धी आणि आरोग्याचे चांगले फायदे

Samruddhi Expressway: समृद्धीवरून थेट मुंबईत पोहोचता येणार, वाहतूक कोंडीतून सुटका होणार; एमएमआरडीएचा नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT