मुंबई

Mumbai Crime: पोलिसांना मिळाली टीप अन् 'त्या' आठ परदेशी नागरिकांना झाली अटक!

भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाल

CD

Mumbai Crime: उत्तन येथे वास्तव्याला असलेल्या म्यानमार देशातील आठ नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तन सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही जण बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.

त्यानुसार छापा टाकत चौक जेट्टी येथे काहीजण घोळक्याने उभे असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिस दिसताच पळून जाण्याच्या तयारीत ते होते. मात्र त्यांना पोलिसांनी अडवून चौकशी केली असता ते म्यानमार देशाचे नागरिक असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे आठ जण उत्तन येथे का आले याचा तपास सुरु आहे असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक कुणाल कुरेवाड करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT