मुंबई

झोपमोड होत असल्याने उत्पादन क्षमतेवर परिणाम

CD

डास चावून ५८ टक्के नागरिकांना त्रास, मलेरिया दिनानिमित्त सर्वेक्षण

मुंबई, ता. २५ : डास चावून झोपमोड होत असल्यामुळे ५८ टक्के प्रौढ नागरिकांच्या उत्पादनक्षमतेवर वाईट परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. जागतिक मलेरिया दिनानिमित्त गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टच्या गुडनाईट या कीटकप्रतिबंधक उत्पादनातर्फे हे सर्वेक्षण झाले होते. या सर्वेक्षणात ६२ टक्के पुरुषांनी आणि ५३ टक्के स्त्रियांनी डासांच्या चाव्यामुळे होणाऱ्या झोपमोडीचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे सांगितले. उद्योग क्षेत्रातील अहवालानुसार डासांपासून होणाऱ्या मलेरियासारख्या आजारांमुळे १६ हजार कोटी रुपयांचा आर्थिक ताण पडतो. उपचारांवरील खर्च, तसेच या रोगामुळे नागरिकांनी गमावलेले उत्पन्न याचा हा एकत्रित आकडा आहे. 

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यात मलेरियाग्रस्त नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टचे अश्विन मूर्ती यांनी दिली. भारतात दरवर्षी चार कोटीपेक्षाही जास्त नागरिकांना डासांमुळे मलेरिया, डेंगीसारख्या आजारांना तोंड द्यावे लागते. अर्थव्यवस्थेतील उत्पादनक्षमता कायम राखण्यासाठी निरोगी मनुष्यबळ आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. डासांचे चावे हे पन्नास टक्के प्रौढ व्यक्तींच्या झोपमोडीचे प्रमुख कारण असल्याचेही त्यांनी सांगितले. डासांच्या चाव्यांमुळे होणाऱ्या रोगांच्या कारणाने रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि इतर आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते, असे संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. कीर्ती सबनीस म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: ठाकरे बंधू एकत्र आले ही चांगली गोष्ट : अमृता फडणवीस

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT