मुंबई

दुरुस्ती कामामुळे पाणी गळती थांबली

CD

रसायनी, ता. ११ (बातमीदार) : रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथे एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्राला अशुद्ध पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी एचओसी कॉलनीत फुटली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन वाया जात असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत होते. एमआयडीसीच्या पाताळगंगा नदीवरील उदंचन केंद्रातून अशुद्ध पाणी उचलून या मोठ्या जलवाहिनीतून वासांबे मोहोपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रात सोडण्यात येत आहे. या ठिकाणी पाणी शुद्ध करून गाव आणि कारखान्यांना पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, जलवाहिनी फुटली असल्याची बाब जागृत नागरिकांनी एमआयडीसीच्या निदर्शनास आणून दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानंतर एमआयडीसीने नुकतेच दुरुस्तीचे काम करून पाणी गळती थांबवली असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे. वासांबे मोहोपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून रसायनीतील तसेच पनवेल तालुक्यातील इतर ग्रामपंचायत आणि रसायनीतील कारखान्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT