मुंबई

ठाणे रेल्वे स्टॉलवर दररोज १२ हजार पाण्याच्या बाटल्यांची विक्री

CD

ठाणे शहर, ता. १५ (बातमीदार) : तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी पार केल्याने ठाणेकरांच्या जिवाची काहिली होत आहे. रेल्वे प्रवास करणारे प्रवासीही उन्हामुळे चांगलेच हैराण झाले आहेत. पाण्यासाठी त्यांचा जीव कासावीस होताना दिसत आहे. प्रचंड गरमीमुळे त्यांची नजर आपसुकच गार पाण्याच्या शोधात असते. ठाणे स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी दररोज १०-१२ हजार मिनरल पाण्याच्या बाटल्या रिचवत आहेत. तर इतर थंडपेयांचेही प्राशन करत आहेत. यामुळे स्थानकातील स्टॉलधारकांना चांगलाच आर्थिक लाभ होताना दिसत आहे.

सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेला उन्हाचा चटका सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाणवत असतो. त्यामुळे भरदुपारी घराबाहेर पडणे अनेक जण टाळतात; परंतु नोकरदार वर्गाला घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामध्ये रेल्वे प्रवाशांचा जास्त समावेश आहे. अशावेळी रेल्वे प्रवासात पाण्याचा एक घोटदेखील महत्त्वाचा ठरतो. एकट्या ठाणे स्थानकात पाण्याची गरज असलेल्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. यातील बहुतांश प्रवासी घरातून निघतानाच पाण्याची बाटली सोबत घेतात. तर स्टेशनवर पाण्याच्या बाटल्या घेणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. एकट्या ठाणे स्थानकात दिवसभरात सुमारे १०-१२ हजार मिनरल पाणी बाटल्यांची विक्री होत असल्याची माहिती रेल्वे स्टॉलधारकांनी दिली.

ठाणे स्थानकातील १० फलाटांवर नऊ स्टॉल आणि दोन छोटे स्टॉल आहेत. प्रवासात या सर्व स्टॉलवर तृष्णा भागवण्यासाठी प्रवासी येत असून, थंडपेय, ज्यूस पिण्यापेक्षा मिनरल पाण्याच्या बाटल्यांना पसंती देताना दिसतात. एका स्टॉलवर सरासरी ८०० ते ९०० पाण्याच्या बाटल्यांची विक्री होत आहे.

मघदूतच्या स्टॉलवर गर्दी
हवेतून पाणी तयार करण्याच्या पद्धतीचे ठाणे स्थानकात मघदूतचे स्टॉल आहेत. यातील प्रत्येक स्टॉलवर पाणी घेण्यासाठी प्रवासी थांबतात.

रेल्वे प्रवासात तहान लागली की बाहेरील थंडपेय पिण्याचे टाळतो. गरज वाटली तर मिनरल पाण्याची बाटली विकत घेऊन तहान भागवते.
-संपदा टेंबे, प्रवासी, ठाणे पूर्व

ठाणे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी फलाटावर सहा ते सात वॉटर कुलर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानकात उतरणारे हजारो प्रवासी या कुलरचे पाणी पितात.
- व्यवस्थापक, ठाणे रेल्वे स्थानक

उन्हातान्हात फिरताना अनेकांना चटकन पाणी अथवा थंडपेय पिण्याची सवय असते; मात्र ही सवय त्रासदायक ठरू शकते. प्रवासात आपल्या शरीराचे तापमान वाढलेले असते, त्यामुळे शरीराच्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी पाच ते दहा मिनिटे थांबून तृष्णा भागवावी. मिनरल पाण्याच्या बाटलीचे बुचाचे झाकण, मॅन्यूफॅक्चरिंग डेट तपासून घ्यावी.
-डॉ. के. डी. यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT