मुंबई

गुजरातमधील पर्यटक बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर

CD

बोर्डी, ता. २ (बातमीदार) : राज्याच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील उंबरगाव आणि नारगोल समुद्रकिनारी प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यामुळे गुजरात राज्यातील पर्यटकांचा ओघ आता बोर्डी या निसर्गरम्य समुद्रकिनारी, तसेच येथील वॉटरपार्कमध्ये वाढला आहे.

आता पावसाळा उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने कोणत्याही वेळी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गुजरात प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावरील बहुसंख्य पर्यटन केंद्रावर पर्यटकांना जाण्यास मनाई हुकूम काढला आहे. गुजरात राज्यातील वापी, सुरत, तसेच अन्य शहरांमध्ये प्रचंड तापमान वाढल्यामुळे थोडासा दिलासा मिळावा, म्हणून त्या भागातील ग्रामस्थ पर्यटनाचा व थोडाफार थंड हवेचा आनंद लुटण्यासाठी उंबरगाव, नारगोल, तसेच अन्य समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात पर्यटनाचा ओघ वाढला होता; मात्र १ जूनपासून गुजरात प्रशासनाने राज्यातील पर्यटकांवर समुद्रकिनारी जाण्यास मनाई हुकूम काढला आहे. हे नागरिक बोर्डी परिसरातील वॉटरपार्क, तसेच समुद्रकिनारी गार्डनमध्ये फिरण्यासाठी येत असल्यामुळे बोर्डी परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

शनिवार आणि रविवार बोर्डीतील पर्यटन क्षेत्र सायंकाळच्या वेळीला गजबजलेली असतात. दुपारच्या वेळी हे पर्यटक वॉटरपार्क अथवा कृषी पर्यटन केंद्रात बगीच्यामध्ये थंड हवेत विश्रांती घेत आनंद लुटत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Election : धुळ्यात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी 'महायुद्ध'; ६० जागांसाठी तब्बल ५५० इच्छुक मैदानात!

Silent Heart Attacks in Women: छातीत दुखत नाही, तरी हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितला महिलांमधील लपलेला धोका

Latest Marathi News Live Update : भारत आणि श्रीलंका महिला संघात आज पाचवा टी२० सामना

Koregaon Bhima Vijay Stambh : कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पाच हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त; सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे नजर!

Palghar News : तीन महिने उलटूनही नुकसान भरपाई नाही; ई-केवायसीच्या अडथळ्यांमुळे मोखाड्यातील शेतकरी कर्जबाजारी!

SCROLL FOR NEXT