मुंबई

लांब पल्ल्याचा सुखकर प्रवास

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : भारतीय रेल्वेने दोन वर्षांमध्ये दहा हजार सामान्य रेल्वे डब्यांची निर्मिती करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. यामुळे लांबपल्ल्याच्या प्रवासात सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
भारतीय रेल्वेत दररोज दोन कोटींपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांना किफायतशीर, वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने पुढील दोन वर्षांत दहा हजार विनावातानुकूलित डब्यांच्या निर्मितीची योजना आखली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ मध्ये, प्रत्येकी ५,३०० पेक्षा जास्त सामान्य डब्यांसह सुमारे दहा हजार कोच तयार करण्यात येणार आहेत.
-------------------------------
आर्थिक वर्ष २०२४-२५
- रेल्वेने अमृत भारत सामान्य कोचसह दोन हजार ६०५ सामान्य श्रेणींचे डबे, अमृत भारत शयनयान कोचसह एक हजार ४७० विनावातानुकूलित शयनयान, अमृत भारत एसएलआर डब्यांसह ३२३ एसएलआर कोच, ३२ उच्च क्षमतेची पार्सल व्हॅन आणि ५५ आसनी डबे तयार करण्याची योजना आहे.
-------------------------------
आर्थिक वर्ष २०२५-२६
- अमृत भारत सामान्य डब्यांसह दोन हजार ७१० सामान्य कोच, अमृत भारत शयनयान कोचसह एक हजार ९१० विनावातानुकूलित शयनयान, अमृत भारत एसएलआर डब्यांसह ५१४ एसएलआर कोच, २०० उच्च क्षमतेची पार्सल व्हॅन आणि २०० पॅन्री व्हॅन आणि कार तयार करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moscow Drone Attack : रशियाची राजधानी हादरली! मॉस्कोवर युक्रेनच्या १००० ड्रोनचा हल्ला, ऑइल रिफायनरीलाही फटका, दोन ठार

Latur DCC Bank : संचालकपदावरून सहकारमंत्रीच बडतर्फ, कारवाई अयोग्य असल्याचा मंत्र्यांचा दावा; RBI विरोधात हायकोर्टात जाणार

Vastu Tips for Kitchen: फ्रिजच्या वर ‘या’ ४ वस्तू ठेवताय? आजच हटवा, होऊ शकतं मोठं नुकसान!

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT