मुंबई

शिमग्यानिमित्त स्थलांतरितांची घरवापसी

CD

कासा, ता. १२ (बातमीदार) : होळीला काही तासांचाच कालावधी शिल्लक आहे. ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिमग्यानिमित्त स्थलांतरित मजूर आपल्या गावी परतताना दिसत आहेत. दिवाळीनंतर उपजीविकेसाठी स्थलांतरित झालेले कातकरी समाजातील अनेक नागरिक आता होळीच्या आदल्या दिवशी आपल्या गावी परतत आहेत.

या स्थलांतरामुळे दीड-दोन महिने गावे ओस पडली होती, मात्र आता शिमग्यानिमित्त नागरिक परतत असल्याने चारोटी नाका येथे मोठी गर्दी झाली आहे. काही जण रिक्षा-टेम्पोने प्रवास करत आहेत, तर काहींना प्रवासासाठी वाहन मिळत नसल्याने सामान डोक्यावर घेऊन पायीच निघाल्याचे चित्र आहे.

गणेशोत्सव, दिवाळी आणि होळी हे सण आदिवासी कातकरी समाज मोठ्या उत्साहात साजरे करतो. त्यात शिमग्याला विशेष महत्त्व आहे. या सणासाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी हे स्थलांतरित मजूर बाजारात गर्दी करत आहेत. घरी पोहोचल्यावर घराची साफसफाई करून चार दिवस सणाचा आनंद घेतल्यानंतर पावसाळा सुरू होईपर्यंत पुन्हा रोजगारासाठी स्थलांतरित होणार आहेत.

महामार्गावरही वाहनांची मोठी गर्दी दिसत असून त्यात स्थलांतरित मजुरांची संख्या लक्षणीय आहे. कडक उन्हाच्या झळा सोसत हे नागरिक घरी परतत आहेत. यासंदर्भात स्थलांतरित मजूर सूरज कोती म्हणाले की, आम्ही दीड महिन्यानंतर शिमग्यासाठी गावी चाललो आहोत. काही पैसे कमवले आहेत, तर काही उधारी घेतली आहे. हा सण नातेवाईकांसोबत साजरा करून घराची थोडी दुरुस्ती करून पुन्हा कामासाठी बाहेर पडणार आहोत. तिथे मजुरी चांगली मिळते आणि गरज पडल्यास उधारीही मिळते, त्यामुळे आम्ही दरवर्षी बाहेर जात असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलं

Ishwarpura News : बाळासाहेब ठाकरेंची अखेर इच्छा पूर्ण, इस्लामपूरचे झाले ‘ईश्वरपूर’; सर्व दस्ताऐवजांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर सलग पाचव्या दिवशी वाहतूक कोंडी; ४ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

AUS vs IND 3rd ODI: भारताचे गोलंदाज चमकले, ऑस्ट्रेलियाला अडीचशेच्या आत रोखले; आता व्हाईटवॉश टाळण्याचं लक्ष्य

Jaykumar Gore : '...तर पंतप्रधान मोदींसोबत चहा पिण्याची संधी मिळणार'; मंत्री जयकुमार गोरेंनी सांगितलं 'हे' खास कारण

SCROLL FOR NEXT