अलिबाग, ता. १९ (वार्ताहर)ः शहरातील मुख्य रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी केली जातात. त्यामुळे वर्दळीसाठी रस्ताच शिल्लक राहात नसल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू असून, वाहनांची संख्या वाढल्याने समस्या अधिकच बिकट झाली आहे.
अलिबाग नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव करण्यात आला, त्या वेळी शहर विकास आराखड्यानुसार अनेकांनी जागा दिली, परंतु आता या ठिकाणी ते आपली वाहने उभी करतात. याबाबत वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला, तर स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. अलिबागमध्ये सुट्टीच्या दिवसांत मोठ्या संख्येने पर्यटक येतात, परंतु वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने त्यांचा संताप होतो. अलिबाग शहरात बँकांसमोर मोठ्या प्रमाणात वाहने उभी करण्यात येत असल्याने कोंडीत आणखीनच भर पडते. ही परिस्थिती टाळण्याकरिता बँकेने एक कर्मचारी वाहतूक व्यवस्थापनासाठी तैनात केला आहे.
वाहनचालकांनी नियम पाळावेत
वाहतूक कोंडीची समस्या, बेशिस्त पार्किंग ही सामाजिक समस्या बनली आहे. चालकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. अलिबाग शहरातील बँकांच्या परिसरात सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार आहोत.
- सोमनाथ लांडे, वाहतूक पोलिस निरीक्षक, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.