मुंबई

अवकाळी पावसाने रोजगार हिरावला

CD

ठाणे, ता. २७ (बातमीदार) : मॉन्सूनने यंदा ग्रामीण भागात अपेक्षेपेक्षा लवकर हजेरी लावल्याने विविध अडचणी उद्भवल्या. या पावसामुळे बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आलेला रानेमवा सडू लागल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले. अनेकांचा रोजगारदेखील हिरावला आहे.
पावसाळा सुरू होताच जंगलात काही विशिष्ट प्रकारची फळे तयार होतात. ही फळे स्थानिक आदिवासी समाजासाठी रोजगाराचे साधन ठरते. कसारा, इगतपुरी परिसरातून ठाण्यातील बाजारात दररोज अनेक महिला रानमेवा विक्रीसाठी येतात. यामध्ये जांभूळ, करवंदे, बोरं आवळा, तेंभुरा, अंजन फळ, चिंचोरा/चिंचफळ यांचा समावेश असतो. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे त्याचा विपरित परिणाम फळांवर झाला आहे. यात सर्वाधिक फटका जांभळे तसेच आंब्याला बसला असून, हंगामातच मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. पाण्यामुळे माल सडल्याने विक्री होण्याआधीच फेकण्याची वेळ आली असून, प्रवासासाठी लागणारा वेळ आणि खर्च पाहता मेहनतीवर पाणी फेरल्याचे चित्र आहे.
-------------------------------------
रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य
पावसामुळे सध्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य आहे. अशातच रस्त्यावर बसण्यासाठी जागा नसल्याने दिवसभर उभे राहून रानमेवा विक्री करण्याची वेळ महिलांवर येत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसणारा गावठी आंबा पावसामुळे दिसेनासा झाला आहे. पावसामुळे त्याच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! जीएसटीमध्ये मोठा बदल होणार, प्रस्तावही पाठवला, काय स्वस्त होणार?

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

Dahi Handi: दहीहंडी उत्सवावर पोलिसांचे विशेष लक्ष, शहरात कडेकोट बंदोबस्त; कशी असेल सुरक्षा?

Raigad News: चिंता मिटली, धरणे भरली! रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये 95 टक्के जलसाठा

Latest Marathi News Live Updates: UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं

SCROLL FOR NEXT