मुंबई

वाहनांच्या बिघाडात दुप्पट वाढ

CD

वाहनांच्या बिघाडात दुप्पट वाढ
पावसाचे पाणी गेल्याने गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी रांगा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता, २६ : मुंबईतील वाहनांची संख्या ४६ लाखांहून अधिक आहे. रविवारी आणि सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले होते. परिणामी वाहनांमध्ये पाणी गेल्‍याने अनेक वाहनांचे नुकसान झाले. विविध ठिकाणच्या गॅरेमध्ये मंगळवारी (ता. २७) वाहनचालकांनी दुरुस्‍तीसाठी गर्दी केली होती.
दररोज एका गॅरेजमध्ये वाहन बिघाडाच्या पाच ते सहा तक्रारी येतात, मात्र मंगळवारी हा आकडा १० ते १५ पर्यंत गेला होता. पावसाळ्यात कार आणि दुचाकीमध्ये पाणी गेल्याच्या जास्त तक्रारी येतात. पेट्रोलच्या टाकीत पाणी किंवा स्पार्कला पाणी लागल्याने वाहने बंद पडतात. त्यामुळे पाण्यात वाहन चालवणे धोक्याचे ठरू शकते.
मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील दृश्यमानता कमी होते. त्यामुळे वाहनचालकांना रस्ता स्पष्टपणे दिसणे आव्हानात्मक होऊन अपघाताचा धोका वाढतो. ओले रस्ते अत्यंत निसरडे होतात, विशेषतः पावसाच्या सुरुवातीच्या काळात. टायर आणि रस्त्याच्या पृष्ठभागामध्ये घर्षण नसल्यामुळे चालकांना त्यांच्या वाहनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते, अपुरी ड्रेनेज व्यवस्था आणि खराब देखभाल केलेले रस्ते पावसाळ्यात धोके वाढवतात. खड्डे आणि पाणी साचलेल्या भागांमुळे अपघाताची शक्यता वाढते.

वाहनांची सर्व्हिसिंग करून घेणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी गेल्याने वाहने खराब होतात. त्यामुळे टायरच्यावर पाणी गेल्यास ते धोकादायक ठरते. त्यामुळे जास्त पाण्याच्या ठिकाणी वाहने चालवू नयेत अन्यथा अपघाताचा धोका आहे.
अजय गोवले, वाहतूक अभ्यासक

पावसामुळे वाहतूक ठप्प
पावसामुळे सखल परिसरात पाणी साचते. पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहनांमध्ये बिघाड झाल्याने एका मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. त्याचा परिणाम उर्वरित मार्गिकेवर होतो. वाहनांच्या रांगा लागतात. कधी-कधी बंद वाहने काढण्यास तीन ते चार तास लागतात. त्यानंतर वाहतूक सुरळीत होते.

मी गेल अनेक वर्षे वाहन दुरुस्तीचे काम करत आहे. पावसाळ्यात वाहनांमध्ये बिघाडीच्या तक्रारी वाढतात. विशेषतः दुचाकी आणि चारचाकी गाड्या जास्त असतात. पाणी गेल्याने अनेक गाड्या बंद पडतात.
सौरभ सिंग, तंत्रज्ञ
इतर वाहनाच्या तुलनेत रिक्षाचे चाक लहान असते. त्यामुळे रिक्षात पाणी जाऊन ब्रेकडाऊन होण्याची शक्यता जास्त असते. कित्येकवेळा रिक्षाचा मीटर बंद पडण्याच्यादेखील घटना घडतात. माझ्या रिक्षात पाणी गेल्यामुळे दुरुस्तीसाठी आलो आहे. पाच हजार रुपयांचा खर्च येणार आहे.
- राजेश भारद्वाज, रिक्षाचालक

मुंबईत दोन दिवस जोरदार पाऊस झाला. पावसाचे पाणी गेल्याने अनेक वाहनांमध्ये बिघाड झाला होता. पावसापूर्वी दिवसभरात चार ते पाच वाहने दुरुस्तीसाठी येत होते. आता दिवसभरात १० ते १५ वाहने दुरुस्तीसाठी येत आहेत.
- रोहित जैसवाल, तंत्रज्ञ

पाच ते १५ हजार खर्च
कारचालक गरीब घरातील आहेत. ते झोपडपट्टी किंवा चाळीत राहतात. पार्किंगची सोय नसल्याने कुठे एका बाजूला गाडी उभी करतात, पण अनेक ठिकाणी नालेसफाई न झाल्याने गाड्यांमध्ये पाणी जाते. अनेकदा रस्‍त्‍यांवरच वाहने बंद पडतात. पावसाचे पाणी गेल्याने पाच हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, असे महाराष्‍ट्र राज्‍य राष्‍ट्रीय कामगार संघाचे ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट युनिटचे अध्यक्ष रिझवान शेख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शेतातच तिरंगा फडकावला

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT