मुंबई

घरखर्च भागवण्याचे वांदे

CD

ठाणे शहर, ता. ५ (बातमीदार)ः ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने मंडळाच्या ७५० सुरक्षा रक्षकांचे पगार दोन महिन्यांपासून रखडले आहेत. त्यामुळे घरखर्च भागवण्याचा नवा पेच सुरक्षा रक्षकांसमोर उभा राहिला आहे.
ठाणे महापालिकेच्या विविध मालमत्तेची काळजी घेण्याकरिता महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाचे ७५० सुरक्षा रक्षक तैनात आहेत. या सुरक्षा रक्षकांना ठाणे महापालिकेकडून महिना अखेरीस पगाराची रक्कम अदा केली जाते, परंतु दोन महिन्यांपासून ठाणे पालिकेकडून सुरक्षा रक्षकांचे पगार थकवल्यामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सुरक्षा रक्षकांपैकी अनेक जण झोपडपट्ट्यांमध्ये राहात असल्यामुळे घराच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे अनेकांना झोपड्यांवर ताडपत्री, प्लॅस्टिक खरेदी करायचे आहे, तर शाळा सुरू होणार असल्याने मुलांकरिता छत्र्या, रेनकोट, पुस्तकांची खरेदीदेखील करता आलेली नाही. त्यामुळे कौटुंबिक समस्यांना समोर जावे लागत आहे. ठाणे पालिकेकडून काही महिन्यांपासून वेळेवर पगार मिळत नसल्याच्या तक्रारी मंडळाच्या सुरक्षा रक्षकांकडून केल्या जात आहेत. सुरक्षा रक्षकांचा पगार १ ते ५ तारखेदरम्यान होणे आवश्यक असताना १० ते १५ दिवस लांबणीवर जातो. अशातच एप्रिल, मेमध्ये छदामही देण्यात आला नाही.
-------------------------------------------------
सुरक्षा रक्षकांना महिन्याच्या हजेरीचा अहवाल दिल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून देयक काढले जाते. पालिकेकडून देयके अदा केली नसतील, तर शालेय शैक्षणिक खरेदी व इतर आवश्यक कामासाठी सुरक्षा बोर्डाकडून सुरक्षा रक्षकांना आगाऊ रक्कम दिली जाईल.
- अशोकराव डोके, अध्यक्ष, बृहन्मुंबई, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ
------------------------
सुरक्षा मंडळाचे बळ
प्रभाग समिती - ३८५
शिक्षण मंडळ - २६९
उद्यान विभाग - ९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT