उड्डाणपुलाच्या कामात अडचणींचा डोंगर
काम पूर्ण करताना प्रशासनाची दमछाक
कल्याण, ता. १४ : कल्याण स्थानक परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे; मात्र उर्वरित १५ टक्के काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे. नेताजी सुभाष चौकात उतरणाऱ्या या मार्गिकेला रेल्वेच्या ब्रेकमन चाळ आणि रेल्वे वसाहतीच्या जागेची प्रतीक्षा आहे. याबाबत रेल्वेला आवश्यक निधी भरणा केला असला तरी रेल्वेकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही. ए पुलाची दुसरी मार्गिका बैल बाजार चौकात उतरणार आहे. हे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित एक मार्गिका उतरणाऱ्या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे अडथळ्यांची शर्यत पार करताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत.
स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत कल्याण स्थानक परिसर विकासाचे काम सुरू आहे. रेल्वेस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा पूल उभारण्याचे काम सुरू आहे. पुलाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असले तरी चारही बाजूंनी उतरणाऱ्या पुलाची कामे रखडली आहेत. त्यातच स्थानक परिसरात बेशिस्त रिक्षाचालक, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, कामासाठी जागोजागी केले जाणारे खोदकाम यामुळे प्रवाशांना या विळख्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
स्थानकाजवळून पुढे जाणारी दुसरी मार्गिका जुन्या भानुसागर टॉकीज परिसरात उतरणार आहे. या मार्गिकेला बी पूल तर तिसरी मार्गिका एसटी स्थानकात गोल फिरून स्थानकात उतरणार आहे. बस स्थानकात उतरविण्यासाठी डी मार्गिका असेल. डी मार्गिका उतरविण्यासाठी स्थानक परिसरात काम करावे लागणार आहे; मात्र बस आत-बाहेर जाण्याचा हा मार्ग असल्याने हे काम रोखण्यात आले आहे. या बसना काही काळ स्थानकात प्रवेश करण्यापासून रोखल्यास ही मार्गिका तयार होऊ शकणार आहे.
सहा महिन्यांत काम पूर्ण
नेताजी सुभाष चौकात उतरणाऱ्या या उड्डाणपुलाच्या मार्गिकेला रेल्वेच्या ब्रेकमन चाळ आणि रेल्वे वसाहतीच्या जागेची प्रतीक्षा आहे. याबाबत रेल्वेला आवश्यक निधी भरणा करण्यात आला असला तरी अद्याप रेल्वेकडून हिरवा कंदील मिळाला नाही. ए पुलाची दुसरी मार्गिका बैल बाजार चौकात उतरणार असून हे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित एक मार्गिका उतरणाऱ्या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. तरी येत्या सहा महिन्यांत ए आणि डी मार्गिका सुरू करणे शक्य होऊ शकेल, असा दावा कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी केला आहे.
खर्च ७०२ कोटींपर्यंत वाढला
एकीकडे स्टेशन परिसरात उड्डाणपूल उभारण्याचे काम संथगतीने सुरू आहे, तर दुसरीकडे या कामाच्या खर्चात चांगलीच वाढ झाली आहे. या प्रकल्पासाठी ४९८ कोटी खर्च अपेक्षित होता, त्यानंतर या प्रकल्पाचा खर्च ७०२ कोटींपर्यंत वाढला आहे. हा उड्डाणपूल नेताजी सुभाष चौकातून कल्याण स्टेशनजवळून पुढे जात बैल बाजार चौकात उतरणार असून या पुलाला ए पूल असे संबोधण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.