मुंबई

भाताच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक

CD

मुरबाड, ता.१४ (बातमीदार)ः तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाला विकलेल्या भाताची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे आठ दिवसात पैसे मिळाली नाहीतर २६ जूनपासून मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा रमेश हिंदुराव यांनी दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२०-२१ मध्ये भातविक्री केलेल्या ठाणे जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांना ८० लाख रुपये बोनस मंजूर केला आहे. पण अजूनही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना भातविक्रीची रक्कम अदा झालेली नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करावी तसेच २०२४-२५ सालासाठी भातविक्रीवर जाहीर बोनस मिळावा, या मागणीसाठी रमेश हिंदुराव यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना पाठविले आहे.
------------------------------
खरीप हंगामातच चणचण
शेतकऱ्यांना चालू हंगामात बी-बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी तसेच भात शेतीची मशागत करण्यासाठी रकमेची गरज आहे. त्यामुळे ८ दिवसांत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाली नाहीतर २६ जूनपासून मुरबाड तहसीलदार कार्यालय समोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yavat Violence : पुण्यातील यवतमध्ये फेसबूक पोस्टवरून वाद; दोन गटात तणाव, पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या....

Ajinkya Rahane, चेतेश्वर पुजारा यांच्या क्रिकेट कारकीर्दीचा दी एंड! टीम इंडियात पुनरागमन होणे अशक्य, मोठे अपडेट्स

Ganeshotsav 2025: गणेश मंडळांना दिलासा! महापालिकेचा १५ हजारांचा दंड अखेर रद्द

Vantara Team Meeting Kolhapur : ठिकाण ठरलं! नांदणी मठाचे महाराज, वनतारा टीमची होणार महत्त्वाची बैठक, महादेवी परतण्याची शक्यता!

Car Red Lines: गाडीच्या मागच्या काचेवर लाल रेषा का असतात? 'हे' आहे कारण

SCROLL FOR NEXT