मुंबई

शासकीय योजनांचा आदिवासींना लाभ

CD

शहापूर, ता.१४ (वार्ताहर): आदिवासी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री ‘धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान’ सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण तालुक्यातील १४६ गावांमध्ये रविवारी (ता.१५) या अभियानाला सुरूवात झाली.
देशातील ६३ हजार तर महाराष्ट्रातील ४ हजार ९७५ आदिवासी गावे या अभियानात सहभागी होणार आहेत. याअंतर्गत राज्यामधील ३२ जिल्ह्यांमध्ये १५ ते ३० जून या कालावधीत जनजागृतीसह विशेष लाभ शिबिर होणार आहे. त्याद्वारे आदिवासींना थेट गावपातळीवर विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे. केंद्र सरकारने जनजातीय गौरव वर्ष २०२५ चे औचित्य साधून प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान अंतर्गत जनजागृतीपर मोहिमेची अंमलबजावणी गावपातळीवर होणार आहे. या उपक्रमात आधार, रेशन, किसान, आयुष्मान भारत कार्ड, जातप्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला,पीएम-किसान,जनधन खाते, पीएम -किसान सन्मान निधी, एफआरए वनपट्टे वाटप, पीएम मातृवंदना योजना, पीएम-उज्ज्वला योजना यांचे वैयक्तिक लाभ एकाच ठिकाणी मिळवून देण्यासाठी गावस्तरीय शिबिरे घेण्यात येणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून केंद्र तसेच राज्याच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ गावपातळीवर उपलब्ध होणार आहे. यासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.
--------------------------------
पालघर जिल्ह्यातील ६५४ गावांचा समावेश
ठाणे जिल्ह्यालगतच्या पालघर जिल्ह्यातील ६५४ गावांमध्ये या अभियानाअंतर्गत विशेष शिबिरे होणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या तुलनेत पालघर जिल्ह्यातील आदिवासी गावांची संख्या अधिक असल्याने ही मोहीम एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरु राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Price: सणासुदीत नागरिकांना दिलासा; गॅस सिलिंडर झाला स्वस्त, नवीन दर काय?

Mahadevi Elephant: अनंत अंबानीच्या लग्नात हत्तीण तीन दिवस एकाच ठिकाणी उभी... महादेवीचे देखील हाल होणार? पेटाकडे उत्तर आहे का?

Latest Marathi News Updates : कर्नाटकने आलमट्टी धरणाची उंची वाढवू नये - मुख्यमंत्री फडणवीस

Nagpur Crime: लुटेरी दुल्हन पोलिसांच्या जाळ्यात; गिट्टीखदान पोलिसांकडून अटक, डझनभर लोकांना अडकवून केली लूट

Nagpur News: १२ हजार घरांमध्ये आढळल्या डेंगी अळ्या; शहरात वाढत्या डेंगी, मलेरियाने मनपा सतर्क, ‘ब्रिडिंग चेकर्स’ सक्रिय

SCROLL FOR NEXT