विक्रमगड (बातमीदार) : आषाढी वारीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्यासोबत जाण्यासाठी विक्रमगड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पालखीचे प्रस्थान झाले. विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, बोईसर परिसरातील वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. या पालखी सोहळ्यात काकडा भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आदी कार्यक्रम केले जातात. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पालखीच्या प्रस्तानापूर्वी सकाळी श्री, ग्रंथ, तुळस यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखीचे प्रस्थान करण्यात आले. त्यापूर्वी विक्रमगड शहरातून टाळ-मृदंगाच्या गजरात व ‘राम कृष्ण हरी’ असा जयघोष करीत पालखी फिरवण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी मार्गस्थ झाला. या पालखीचे नेतृत्त्व ह.भ.प. अनिल महाराज डोके हे वारकऱ्यांच्या सहकार्याने करीत आहेत. पालखी सोहळ्याचे हे १३वे वर्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.