मुंबई

थॅलेसेमियावर यशस्वी उपचार

CD

थॅलेसेमियावर यशस्वी उपचार
फडणवीसांच्या मदतीने कर्जतच्या वेदांतला मिळाले जीवनदान
कर्जत, ता.१५ (प्रतिनिधी) ः कधीकाळी अंथरुणावर खिळलेला १४ वर्षांचा वेदांत मनोहर ठाकरे आज स्वतःच्या पायावर उभा आहे. थॅलेसेमियासारख्या दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या कर्जत येथील या बालकाला मुंबईतील एसआरसीसी रुग्णालयात मिळालेल्या आधुनिक उपचारांनी नवे जीवन मिळाले आहे.
कर्जत तालुक्यातील सामान्य कुटुंबात जन्मलेला वेदांत अवघा सहा महिन्यांचा असताना त्याला थॅलेसेमिया मेजर असल्याचे निदान झाले. हा एक अनुवंशिक रक्तविकार असून यात रुग्णाला दर महिन्याला रक्त चढविणे अनिवार्य असते. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या ठाकरे कुटुंबियांसाठी हा खर्च मोठा होता. दहा वर्षे सतत रक्त बदलण्याच्या प्रक्रियेत कुटुंबातील आशा हळूहळू मावळत गेल्या. एकीकडे उपचाराचा खर्च अंदाजे ४० लाख रुपये, तर दुसरीकडे घरात उत्पन्नाचे निश्चित साधन नाही. अशा स्थितीत वेदांतच्या पालकांनी स्थानिक भाजप नेते किरण ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली.
फडणवीस यांच्या टीमने एसआरसीसी रुग्णालय, मुंबई येथे उपचाराची जबाबदारी घेतली. त्याच्या वडिलांच्या प्लाझ्माचा वापर करत प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू झाली. मागील वर्षी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर घरी एक वर्ष उपचार सुरू ठेवण्यात आले. यानंतर काही काळ निरिक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या वेदांतने लढा दिला आणि ही लढाई जिंकली.
आज वेदांत सेफ झोनमध्ये आहे, त्याची प्रकृती स्थिर असून तो पुन्हा सामान्य जीवन जगू लागला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने फडणवीस यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. माझे आयुष्य वाचले... मला एकदम भारी वाटतेय! असे भावनिक उद्गार वेदांतने व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Shivsena Protests : मुंबईत कॉंग्रेस विरोधात पेटले शिंदेंचे शिवसैनिक! पृथ्वीराज चव्हाणांनी कोणतं वक्तव्य केलं होतं?

PM Narendra Modi : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचं वचन पूर्ण; 'ऑपरेशन सिंदूर' काशी विश्वेश्वराला समर्पित...वाराणसीत नेमकं काय म्हणाले मोदी?

Mohammed Siraj: 'तू का परत जातोय, मी ५ विकेट्स घेतल्यावर...' सिराज बुमराहला मायदेशी परतण्यापूर्वी काय म्हणाला?

Karnataka News: फक्त १५ हजार पगार असूनही कोट्यवधींचा मालक;२४ घरे, ४० एकर शेती, सोनं, चांदी, वाहने आणि बेहिशोबी मालमत्तेचा स्फोट

Rahul Gandhi : आयाेगातील लोकांचे देशविरोधी काम, राहुल गांधी यांचा घणाघाती आरोप; भाजपसाठी मतांची चोरी

SCROLL FOR NEXT