मुंबई

अलिबाग-वडखळ मार्गावरील कोंडी सुटणार

CD

अलिबाग, ता. १८ (वार्ताहर) ः मुंबई, पुण्यापासून जवळ असलेले अलिबाग सर्वांचेच आवडते पर्यटनस्‍थळ असून वीकेण्डला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे अलिबाग-वडखळ महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्‍या उद्‌भवते. स्थानिकांसह पर्यटकांनी याप्रकरणी अनेकदा तक्रार केली आहे. यावर उपाययोजना करण्याचे तसेच अवजड वाहतुकीचे योग्‍य नियोजन करण्यात येईल, असे आश्‍वासन नुकतेच जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून याबाबतची त्वरित अधिसूचना काढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वीकेण्डसह इतर सुट्ट्यांच्या दिवशीही अलिबागमध्ये हजारो पर्यटक येतात. त्यामुळे अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. ही कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांचीही दमछाक होते. २५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागत असल्‍याने वाहनचालक आणि प्रवाशांमधून संताप व्यक्‍त होत आहे. त्यामुळेच या मार्गावर शनिवारी- रविवारी अवजड वाहतुकीबाबत नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार शुक्रवारी ज्या वेळी पर्यटक येतात व रविवारी ज्या वेळी पर्यटक परतीच्या मार्गाला लागतात, त्या दरम्‍यान अलिबाग- वडखळ मार्गावरील अवजड वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे.
बेशिस्त वाहनचालक आणि अवजड वाहनांमुळे कोंडीत आणखी भर पडत असल्‍याने वीकेण्डला या मार्गावरील अवजड वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटू शकेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

चौपदरीकरण रखडले
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता; मात्र आता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे; मात्र रस्ता हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे सांगत, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले आहे. दोन विभागांच्या वादात रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

अलिबाग-वडखळ मार्गावर सध्या वडखळ येथे सात, पोयनाड येथे पाच आणि पेझारी चेक पोस्ट येथे सहा वाहतूक पोलिस तैनात असतात. शनिवार-रविवारी या मार्गावर अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनीही चर्चा केली आहे. त्यानुसार लवकरच या मार्गावर शनिवारी सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत व रविवारी दुपारी दोन वाजल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात येईल, असा प्रस्ताव तयार करून मंजुरीनंतर तशी अधिसूचना जारी करण्यात येईल.
- सोमनाथ लांडे, वाहतूक निरीक्षक, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT