वाशी, ता. १८ (बातमीदार) : वाहन विक्रीनंतर नागरिकांच्या पत्त्यावर पाठविलेले वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) स्मार्ट कार्ड स्वरूपात वेळेवर पोहोचत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मागील पाच महिन्यांत एकूण एक हजार ६६८ आरसी कार्ड विविध कारणांमुळे नागरिकांपर्यंत पोहोचू शकली नाहीत.
नवी मुंबई आरटीओ कार्यालयात ही कार्ड परत आली आहेत. त्यातील ५७४ आरसी कार्ड संबंधितांनी कार्यालयात येऊन ताब्यात घेतली आहेत; तर उर्वरित तब्बल एक हजार ९४ कार्ड अजूनही अनक्लेम्ड आहेत. संबंधितांनी ती घेऊन जावीत, असे आवाहन आरटीओच्या वतीने करण्यात आले आहे. आरसी बुक परत येण्यामागे चुकीचा किंवा अपुरा पत्ता नोंदविणे, नवीन इमारतीच्या पत्त्यांची अद्ययावत माहिती नसणे, पोस्टमनकडून संबंधित व्यक्ती न सापडल्याचा अहवाल तसेच दिलेल्या पत्त्यावर संबंधित नागरिक नसणे किंवा स्थलांतर करणे ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे वाहन खरेदी करताना पूर्ण व अचूक पत्ता द्यावा. आरसीची स्थिती पोर्टलवर तपासावी, असे आवाहन नवी मुंबई आरटीओचे सहाय्यक परिहवन अधिकारी गजानन गावंडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.