जुईनगर, ता. २३ (बातमीदार) : श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या ‘घर-घर संपर्क अभियान’ कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी (ता. २३) सीवूड्स-करावे नगरमधील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला. या अभियानाद्वारे भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनतेच्या अडचणींवर चर्चा करतील. भविष्यातील विकासकामांबाबत नागरिकांचे मत जाणून सरकारने केलेल्या कामांची माहिती देतील, तसेच महापालिका निवडणुकीसाठी जनतेच्या सूचना संकलित करण्याचे काम या अभियानात केले जाणार आहे.
भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सीवूड्स येथून अभियानास सुरुवात करण्यात आली. २३ जून ते २३ ऑगस्टपर्यंत संपूर्ण महिनाभर अभियान पार पडणार आहे. विभागातील प्रत्येक नागरिकाचा विश्वास संपादन करून त्यांच्या सहभागातून मजबूत विकास आराखडा तयार करतील. त्यातून पारदर्शक व जबाबदार स्थानिक स्वराज्य संस्थेची उभारणी होण्यास मदत होईल, असे अभियानाचे उद्दिष्ट असल्याची माहिती युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी दिली. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, मंडळ अध्यक्ष सुधीर जाधव, कुणाल महाडीक, भास्कर यमगर, माजी मंडळ अध्यक्ष जयवंत तांडेल, राजेश राय, मंगल घरत, विकास पाटील, बापू दडस, धवल माने, श्रवण कुमार त्रिवेदी, देवेंद्र पॅथी, माधवसिंग राजपूत, सुहास वेखंडे यांच्यासह अभियानाच्या संयोजक अश्विनी घंगाळे उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.