मुंबई

अंड्यांच्या किमतीत वाढ

CD

तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : पावसाळा सुरू झाला की बहुतांश लोकांच्या आहारात अंड्यांचा समावेश होतो. पावसाळा सुरू झाला की समुद्रातील मासेमारी बंद असते. त्यामुळे मांसाहार करणाऱ्यांना अंड्यावर ताव मारावा लागतो. वाढत्या मागणीमुळे सध्या अंड्याचे भाव वाढले आहेत. गेल्या महिन्यात ७० रुपये डझन मिळणारी अंडी सध्या ८० रुपये डझनाने मिळत आहेत.
अंडी शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक असल्याने अंडी खाणे शरीरासाठी चांगले असते. अंडी खाल्ल्याने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक असे बहुतांशी घटक शरीराला मिळत असतात. मानवी शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व पोषणमूल्य अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्ती राहण्यास मदत होते. त्याचमुळे आहारात नियमितपणे अंडी आवश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञ, डॉक्‍टर देत असतात. पावसाळ्यात कोंबड्यांची संख्या घटते, त्यामुळे अंड्यांचा पुरवठा कमी होतो. पावसाळ्यामुळे वाहतूक आणि वितरणामध्ये अडचणी येतात, ज्यामुळे अंड्यांच्या किमती वाढतात. मासेमारी बंद असल्यामुळे अनेकांचा मोर्चा अंड्यांकडे वळतो. त्यामुळे या काळात भाववाढ होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT