जुईनगर, ता. २६ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी बाजार समिती सचिवांनी नियमानुसार अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या केल्या होत्या; मात्र बदली मान्य नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बदल्या रद्दसाठी संचालक मंडळाकडे धाव घेतली होती. तात्पुरत्या स्वरूपात बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत अधिक अभ्यासपूर्वक विचार करून बदल्यांचा निर्णय घेणार आहोत, असे एपीएमसीचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी सांगितले.
एपीएमसीतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या हा प्रशासकीय निर्णय असूनदेखील तो काही कर्मचारी मान्य करीत नसल्याने बाजार समितीत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासकीय निर्णयात संचालकांचा हस्तक्षेप झाल्याने बाजारात खळबळ उडाली आहे. मागील महिन्यात बाजार समितीमधील ६० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले होते; मात्र काही कर्मचाऱ्यांनी बदल्या मान्य केल्या नव्हत्या. बदल्या रद्दसाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. यावर एपीएमसीच्या सचिवांनी तात्पुरता तोडगा काढला. त्यांनी केलेल्या बदल्या काही कालावधीसाठी रद्द केल्या आहेत. येत्या काही दिवसांत अधिक अभ्यासपूर्वक विचार करून बदल्यांचा निर्णय घेणार आहोत, असे एपीएमसीचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी सांगितले.
--------------
रुजू न झाल्याने कामावर परिणाम
बदलीचे आदेश असूनही अधिकारी-कर्मचारी नवीन जागी रुजू न झाल्याने संबंधित विभागाच्या कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून येत होते. संबंधित बदल्यांबाबत संचालक मंडळ नाखूष होते. शिवाय, सातत्याने बैठका घेऊन बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी होत होती. करण्यात आलेल्या बदल्या नियमबाह्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.