मुंबई

वसई-विरार शहरात अस्वच्छतेचे डोंगर

CD

वसई, ता. २८ (बातमीदार) : पावसाळ्यात साथीचे आजार निर्माण होऊ नये, म्हणून दक्षता घेण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. असे असले तरी शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग होत आहेत. यामुळे डासांची पैदास, माशांचा प्रादुर्भाव वाढण्याची आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. यासाठी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.
वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढते नागरिकीकरणाच्या मानाने कचराही तितकाच वाढू लागला आहे. प्रति दिन ७०० टन कचरा हा शहरातून जमा होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाकडून क्षेपणभूमीवर जमा केला जात आहे. वसई, नालासोपारा, विरार आणि नायगाव ही प्रामुख्याने शहरे व गावातील भागाचा समावेश महापालिकेत आहे. त्यामुळे घरातील ओला आणि सुका कचरा अधिक असतो. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नियमित नियोजन केले जात आहे; मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे.
पावसाळ्यात साचलेले पाणी, कचरा यामुळे डासांची उत्पत्ती होत असते. परिणामी, डेंगी, मलेरिया, ताप यांसह अन्य आजार उद्‍भवत असतात. आरोग्य विभागाकडून दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करूनही खाद्यपदार्थांचे वेष्टन, नाशवंत वस्तू यांसह प्लॅस्टिकसह अन्य कचरा दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने उपायोजना आखाव्यात, अशी मागणी केली जात आहे. नागरिकांनी कचरा कुठेही न भिरकावता कचराकुंडीत जमा करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.
------------
कचरा वर्गीकरणाकडे दुर्लक्ष
कचऱ्याचे वर्गीकरण करून नागरिकांनी स्वतंत्र दोन डब्यांत कचरा जमा करावा, असे आवाहन केले; मात्र तरीही वर्गीकरण होत नाही. त्यामुळे महापालिका स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना हा कचरा वेगळा करून नंतर क्षेपणभूमीवर न्यावा लागत आहे. पालिकेला सहकार्य करून कचरा वर्गीकरण करावे, असे आवाहनही वेळोवेळी केले जात आहे.
--------------
स्वच्छता विभागाकडून नियमित कचरा उचलला जात असतो. कचरा इतरत्र न टाकता प्रत्येक भागात येणाऱ्या कचरागाडीत किंवा कचराकुंडीत जमा करावा. ज्या भागात कचरा अधिक निर्माण होत असेल, तिथे नियोजन केले जाईल.
- अर्चना दिवे, उपायुक्त
----- --------------
पावसाळा सुरू झाल्याने विविध आजारांची शक्यता अधिक आहे. त्यामुळे महापालिकेने कचरा व्यवस्थापन करण्याची गरज आहे. बऱ्याच भागात अस्वच्छता निर्माण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याकडे महापालिकेने तातडीने लक्ष द्यावे.
- अजिल चाको, कार्यकर्ता, बविआ
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: ''कटकारस्थान'', भाजप आमदाराने फडकावला उलटा तिरंगा; कोण आहेत संजय पाठक?

Neeraj Chopra Wife: 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची पत्नी हिमानीने घेतला धाडसी निर्णय; दीड कोटींचं पॅकेज नाकारलं अन् टेनिसलाही अलविदा, कारण आता...

Latest Maharashtra News Updates : येरमाळा महसूल मंडळात गुरुवारी रात्री अतिवृष्टी

AUS vs SA 3rd T20I: ग्लेन मॅक्सवेलच्या 'विचित्र' शॉटने बदलले मॅचचे चित्र! ऑस्ट्रेलियाने थरारक विजयासह जिंकली मालिका Video Viral

Crime: धक्कादायक! २८ वर्षीय तरुणीचे अल्पवयीन मुलावर प्रेम जडले, घरातून पळवून नेलं अन्...; नंतर जे घडलं ते भयानक होतं

SCROLL FOR NEXT