खारघर, ता. १ (बातमीदार) : खारघर परिसरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्यामुळे पोटदुखी, जुलाब आणि उलटी यांसारख्या आजारांत वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
खारघर आणि तळोजा परिसरात ऐन पावसाळ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. दरम्यान, पावसाळ्यात खारघर आणि तळोजा परिसरातील काही भागांत मलनिस्सारण वाहिन्या तुडुंब भरल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसत आहे. त्यातच नागरिकांना गढूळ पाणीपुरवठा होत असल्यामुळे उलट्या, जुलाब आणि पोटदुखी यांसारख्या आजारात वाढ झाल्याचे समजते. या संदर्भात डॉ. बी. डी. कुरकुटे यांच्याशी संपर्क केला असता, दूषित पाण्यामुळे, तसेच बाहेरील खाद्यपदार्थांमुळे उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे, तसेच बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असे सांगितले. या संदर्भात सिडकोच्या पाणीपुरवठा विभागात विचारणा केली असता, खारघर सेक्टर- ११ मधील एका सोसायटीकडून दूषित पाणीपुरवठ्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. पालिकेच्या मदतीने यावर तोडगा काढला जाईल, असे सांगितले.
---------------------
खारघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाण्यामुळे पत्नी आजारी आहे. मी स्वतः तीन दिवस पोटदुखी आजाराने त्रस्त होतो. या संदर्भात सिडकोकडे ऑनलाइन तक्रार केली आहे.
- गणेश बनकर, रहिवासी, खारघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.