पालघर, ता. ३ (बातमीदार) : अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील रस्त्यांवरील पूल पुराच्या पाण्याखाली जातात. त्यामुळे गाव-पाड्यांचा संपर्क तुटण्याच्या घटना घडत आहेत. पुराच्या पाण्याखाली जाणारे पूल व रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पाण्याखाली जाणाऱ्या पुलांची माहिती तहसीलदारांकडून प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेतील तफावत दूर करण्यासाठी धरती आबा अभियान राबविण्यात येत आहे. त्याबाबतचा पूर्ण प्रस्ताव पालघर जिल्हा परिषदेने सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील एकूण ८५ पूल आणि रस्ते पाण्याखाली जाणारे आहेत. पूररेषेच्या पातळीनुसार पूल दुरुस्ती अथवा उंची वाढविणे किंवा आवश्यक उपाययोजना करण्याकामी नमूद पुलाचे अंदाजपत्रक १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहेत. या कामांपैकी आदिवासी क्षेत्रातील कामे आदिवासी उपाययोजनांमधून व बिगर आदिवासी क्षेत्रातील कामे ही जिल्हा नियोजन समिती व विभागाच्या इतर योजनेतून पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष भागडे यांनी सांगितले.
तालुका पाण्याखाली जाणारे पूल, रस्ते
पालघर ४
वसई ५
डहाणू २४
तलासरी ४
वाडा १८
विक्रमगड १३
जव्हार १४
मोखाडा ३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.